फास्टिंग रक्तातील साखरेचे प्रमाण याची तपासणी कधी केली पाहिजे?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:49

ब्लड शुगर चेक करण्यापूर्वी चुकूनही या चुका करू नका

 ब्लड शुगरचे रिपोर्ट काही कारणांमुळे चुकीचे होऊ शकतात. अनेकजण नकळत काही चुका करतात; ज्यामुळे रक्तातील शुगरचा रिपोर्टवर परिणाम होतो. शिवाय मधुमेहाचे रुग्ण बऱ्याच वेळा त्यांच्या सोयीनुसार घरी रक्तातील साखर तपासतात. 

डॉक्टरांच्या शिफारसीनुसार दर तीन महिन्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण मोजणी करुन घ्यायला हवी. उच्च रक्तातील साखरेच्या रुग्णांना म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी दरमहा आणि गंभीर प्रकरणांमध्ये दर आठवड्यात त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासणे गरजेचे आहे. मधुमेह हा एक तीव्र आजार असून, ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप महत्वाची आहे. जर त्याची पातळी लेव्हलमध्ये नसेल तर रूग्णांना त्यांच्या आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा काही चुकांमुळे चाचणीत रक्तातील साखरेच्या पातळीत गोंधळ होऊ शकतो. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेची तपासणी करताना काय खबरदारी घ्यावी; हे माहित असणे आवश्‍यक आहे.

साखरेची पातळी कशी करावी
बऱ्याचदा मधुमेह रूग्ण त्यांच्या सोयीनुसार घरी रक्तातील साखर तपासतात. शिवाय अनेकजण दररोज किंवा काही दिवसांच्या अंतराने त्यांच्या रक्तातील साखर तपासतात. मुळात अशा प्रकारे तपासणी करणे चुकीचे ठरते. ग्लुकोज मॉनिटर, रक्तातील ग्‍लुकोज मीटर, ग्लाइकेटेड हिमोग्लोबिन (ए 1 सी) चाचणी किंवा रूग्ण कोणत्याही लॅबमध्ये जाऊन चाचणी करू शकतात. तसेच लघवीद्वारे रक्तातील साखरेची पातळी देखील तपासू शकतात. परंतु बहुधा नकळत काही चुका होतात. ज्यामुळे रक्तातील साखर तपासणीवर परिणाम होतो व त्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे

खाल्‍यानंतर तपासणी करणे
या चाचणीला इंग्रजीत पोस्ट- प्रँडियल रक्त शर्कराची चाचणी म्हणतात. याअंतर्गत अन्न खाल्ल्यानंतर शरीरात ग्लूकोजची पातळी किती हे मोजले जाते. यामध्ये दोन तास खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. तथापी जेवणानंतर त्याच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.

पाणी प्यावे की नाही?
बरेच लोक रक्तातील साखर तपासून पाणी प्यावे की नाही? असा विचार करतात. पण आरोग्य तज्ञांच्या मतानुसार तहान लागल्यामुळे रक्तातील साखर तपासणीत त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या शरीरात पाण्याची कमतरता नसल्याचे सुनिश्चित करा. तथापी चाचणीपूर्वी मद्यपान करणे टाळायला हवे.

हात धुणे योग्य आहे काय 
तपासणी करण्यापूर्वी जर आपले हात स्वच्छ नसतील, तर जणू काही खाण्यापिण्यानंतर आपल्या हातात काहीतरी उरले असेल; तर ते धुणे आवश्यक आहे. कारण तशाच हातांमुळे तपासणी करणे चुकीचे होऊ शकते. मुळात तपासणीसाठी वापरत असलेले कोणतेही बोट ते स्वच्छ करण्याचे आवश्‍यक आहे. चाचणीच्या आधी आणि नंतर बोट स्वच्छ करा.


solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info